झी मराठीवर 'अगं बाई सासूबाई' या सिरीयल मध्ये मी निवेदिता जोशी सराफ यांचा डायलॉग मी ऐकला,प्रत्येक स्त्रीमध्ये एक उद्योजिका असतेच तिला फक्त बाहेर काढण्याची गरज आहे,योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे.
तुमच्यामध्ये देखील एक उद्योजिका दडलेली आहे का ?
नमस्कार माझं नाव केतन गावंड!
2008 पासून मी ट्रेनिंग क्षेत्रात काम करतो.
मी मॅक्स न्यूयॉर्क लाइफ इन्शुरन्स (MNYL) कंपनी मध्ये असताना माझ्याकडे अनेक महिला इन्शुरन्स ॲडव्हायझर यायच्या. वय साधारणतः 35 ते 45 वर्ष.
महत्त्वाकांक्षी, सुशिक्षित,उच्चशिक्षित,अनुभवी,कार्यक्षम,तल्लख, संवाद कुशल आणि संवेदनशील.
मला त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच आश्चर्य वाटायचं की इतके वर्ष ह्या फक्त गृहिणी म्हणून कशा जगत होत्या.
त्यांच्याशी बोलताना मला जाणवायचं की कुटुंबासाठी आणि इतरांसाठी त्यांनी जबरदस्त त्याग केलेला आहे.
स्वतःच्या आशा-आकांक्षा कौशल्य यांना बाजूला सारून त्या फक्त कुटुंबासाठी जगत आलेल्या आहेत.
एक पर्व नवऱ्यासाठी आणि दुसरं पर्व मुलांसाठी खर्ची घातलेलं आहे आणि त्याना ह्याबद्दल कधीच वाईट वाटलेलं नाही.
आता नवरा आपल्या व्यवसायात आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात खूप जास्त व्यस्त झालाय त्यामुळे ,बायकोसाठी इच्छा असूनही तो वेळ काढू शकत नाही.
मुलं अशा वयात येऊन पोहोचली आहेत की त्यांना आता आईच्या पंखा खालून बाहेर पडून स्वतःचे विश्व निर्माण करण्याची इच्छा सतावू लागली आहेत.
या अशा विचित्र परिस्थितीमध्ये या महत्त्वाकांक्षी स्त्रियांना आयडेंटिटी क्रायसिस (Identity Crisis) निर्माण होऊ लागतो.
स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या धडपडू लागतात.
काही, त्यांचे विसरलेले छंद जसं गाणं, फोटोग्राफी ,पेंटिंग ,शिवणकाम अशा वेगवेगळ्या छंदांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतात तर काही आपलं मन,किती पार्टी आणि मैत्रिणींमध्ये रमवतात.
काही स्वावलंबी होण्यासाठी इन्शुरन्स किंवा नेटवर्क मार्केटिंग सारखं क्षेत्र निवडतात.
काही छोटा-मोठा जॉब करायला सुरुवात करतात.
पण या सगळ्या मागे फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची सुप्त इच्छा असते,स्वतःला सिद्ध करून काहीतरी करून दाखवण्याची तळमळ असते.
काहीना योग्य मार्ग सापडतो तर काहींच्या आत तेवणारा तो दिवा, काही दिवसातच सांसारिक जबाबदाऱ्या, ठरलेलं रुटीन आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावी विजून जातो.
प्लस या वयात येणाऱ्या हॉर्मोनल चेंजेस मुळे त्या जास्त चीडचिड्या , असुरक्षित आणि एकाकी व्हायला लागतात .
तुम्ही देखील असाच काही अनुभवलय का ?
मिशन ऑनलाइन स्वराज्य या प्लॅटफॉर्मची निर्मिती केल्यानंतर अशा अनेक महत्त्वाकांक्षी गृहिणी कम उद्योजकांच्या मी संपर्कात आलो.
त्यांनी केलेली प्रगती पाहून मी थक्क झालोय.
इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांच्या पॅशनला न्याय देत, स्वतः ऑनलाइन स्वराज्य निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे
- त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे
- त्यांच्यात जास्त सकारात्मकता आलेली आहे
- त्या स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागल्या आहेत.
- स्वतःला व्यक्त करायला शिकल्या आहेत
- व्हिडिओ बनवून युट्युबर बनल्या आहेत
- ब्लॉग लिहून ब्लॉगर झाल्या आहेत
- इतरांचे मनापासून कौतुक करायला शिकल्या आहेत
- स्वतःच्या प्रायॉरिटी व्यवस्थित मॅनेज करायला लागल्या आहेत
त्यांच्या प्रगतीला मी जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की या वैश्विक महामारीत,लॉकडाऊन मध्ये आणि प्रचंड नकारात्मकता असताना देखील ह्या सगळ्यांनी आऊटस्टँडिंग रिझल्ट मिळवले आहेत.
माझ्या लक्षात आलं की या आधीपासूनच सुपरस्टार आहेत,कित्येक जबाबदाऱ्या एकाच वेळी या लीलया पेलू शकतात
योग्य टाईम मॅनेजमेंट करू शकतात
फक्त गरज होती ती
- योग्य मार्गदर्शनाची
- योग्य वातावरणाची आणि
- सातत्याने योग्य कृती करण्याची
ह्या तीन गोष्टी मिळाल्या की सामान्य वाटणारी गृहिणी देखील असामान्य गोष्टी करायला तयार होते.
तुम्ही असं काहीतरी करण्याचा विचार करताय का ?
कारण सध्याच्या बदलणाऱ्या वातावरणात आपल्या जबाबदार्यादेखील झपाट्याने बदलत आहेत.
कदाचित आत्तापर्यंत प्रामुख्याने तुम्ही कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी घेतलीत , आता तुम्हाला स्वतःची जबाबदारी घ्यावी लागणार आहे, स्वतःला भविष्यासाठी तयार करावं लागणार आहे
कदाचित कुटुंबाची थोडीफार आर्थिक जबाबदारी देखील तुम्हाला उचलावी लागणार आहे.
तुम्ही जे करताय तेच करत राहिलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळाला आहे तुम्हाला असं काहीतरी हवं असेल जे आजपर्यंत मिळालं नाही तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत केलेला नाही
- सध्याच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या अनेक महिलांना मी,
- स्वतःचा आवाज ओळखून
- योग्य ध्येय ठरवून
- टेक्नॉलॉजी हाताळायला तयार करून
- व्यक्त व्हायला मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे.
त्या आता स्वतःच्या आयुष्याच्या लेडी बॉस झाल्या आहेत.
श्रद्धा पाटील, माया दणके, अक्षदा विचारे,स्वाती अभंग,हर्षाली एडणकर ,प्रणोती शितोळे ह्या अशाच काही ऑनलाईन स्वराज्यातल्या रणरागिणी आहेत.
यांना बघून तुमच्या मनात देखील जर काहीतरी करण्याची इच्छा जर बळावून आली तर मला नक्की कळवा.
एका नवीन आयुष्याची सुरुवात करून करण्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल,
आनंदी, संयमी आणि भक्कम आयुष्य जगायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लेडी बॉस 2021 तीन तासाच्या वर्कशॉपसाठी रजिस्टर करा व माझं ऑनलाइन स्वराज्यनिर्मीतीच्या सहा पायऱ्या हे पुस्तक मोफत मिळवा.
तुमच्यामध्ये दडलेल्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या त्या लेडी बॉसला माझा सलाम, सदैव तुमच्या सेवेत तत्पर .
ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच.

















